जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- सर्वत्र पावसाळा ऋतू सुरू झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतीसाठी विद्युत मोटार पंपाद्वारे शेतकऱ्यांना शेतीला पाणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतो, दरवर्षी सर्पदंशाने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला असून याकडे शासन नेहमीच पाठ फिरवीत असतांनाचे चित्र दिसून येत आहे.
म्हणून वन्य प्राणी तसेच विषारी सापांपासून बचाव व्हावा यासाठी शासनाने २४ तास शेतकऱ्यांना विद्युत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी योगेश ठूने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चिमूर यांनी केली व २४ तास विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल आसा ईशारा सुद्धा देण्यात आला आहे. यावेळी चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, रमेश करारे, सुखदेव गराटे ओबीसी तालुका अध्यक्ष, संदीप शेंद्रे , प्रवीण राऊत उपस्थित होते.