Breaking News

दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांची पिळवणूक

सोयाबीन व धानाला योग्य भाव द्या व योग्य भावात खरेदी करा अन्यथा आंदोलन करणार ग्रा.प.सदस्य शुभम मंडपे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

शंकरपुर :- ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही अशातच सोयाबीन ची फसल निघाली आहे आणि सोयाबीन ला वाढीव भाव नसून अक्षरशः शेतकरी राजाची बळीराजाची पिळवणूक शंकरपूर परिसरात होत आहे बाजार समितीची चा भाव हा 5100 आहे व शंकरपूर परिसरात 4300 व 4400 ह्या भावाने अक्षरशः लूटमार व्यावसायिक करत आहेत.

मात्र याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती चे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तरी यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करू याचा इशारा आंबोली ग्राम पंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी दिला आहे,महिनाभरा अगोदरच शंकरपूर मध्ये बोगस खताची निदनिय घटना घडली व यामुळे शेतकऱ्यांची वेळोवेळी पिळवणुक व अन्याय होत आहे आणि सध्या आता दारात दिवाळी असल्याने धान ,

सोयाबीन ह्या मालाची फसल निघाली आहे मात्र अशातच धानाला योग्य भाव नाही त्यामुळे शेतकरीराजा बळीराजा हा उदास झाला आहे व शेतकऱ्यांवर असंतोषाचे वतावरण निर्मान झाले आहे व शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो मात्र अशातच दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची पिळवणूक ही निंदनीय घटना आहे त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी शेतकऱ्याची बळीराजाची व्यथा मांडली आहे व या प्रकरणावर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू याचा इशारा प्रशासनाला दिला आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved