नगर परिषदेने बाजार समितीचे आवारातच तात्काळ व्यवस्था करावी – काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर येथील आठवडी बाजार शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच भरत होते परंतु काही दिवसापूर्वी नगर परिषदेने बाजार समितीच्या आवारात आठवडी बाजारची व्यवस्था केली व बाजार भरणे सुरू झाले. परंतु पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्याचा पहिला पाऊस पडताच आठवडी बाजार नगर परिषदेच्या आशिर्वादाने पुन्हा मुख्य रस्त्यावर आले. बाजार समितीच्या आवारात नगर परिषदेने चुरी , मुरूम काहीच मलमा टाकलेला नसून बाजार समितीच्या आवारात काळया मातीची जागा आहे. त्यामुळे बरोबर चालता येत नाही.
म्हणून काही मटेरियल टाकून जागा व्यवस्थित करायला पाहिजे होते परंतु नगर परिषदेने कोणतीही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. आणि आठवडी बाजार हा पुन्हा एकदा मुख्य रस्त्यावर आले, त्यामुळे मुख्य रस्त्यावर पुन्हा अडचण निर्माण झाली असून कोणत्याही प्रकारची जिवितहानी किंवा आपघात झाल्यास नगर परिषद प्रशासन यास जबाबदार राहणार करीता याकडे तात्काळ लक्ष वेधून आठवडी बाजाराची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिला आहे.