Breaking News

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उच्च नीती मूल्यांची जपवणूक करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केलेल्या छत्रपती शिवराय व छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला संपूर्ण भारतवर्षात तोड नाही. ह्याच विचारांचा वारसा अत्यंत दैदिप्यमान पद्धतीने जोपासत कार्यरत असलेले छत्रपती शाहू महाराज आपल्या सर्वांसाठी अत्यंत स्फूर्तिदायी व प्रेरणादायी आहेत. त्यांच्या सर्वोपयोगी चांगल्या कार्यातून कोल्हापूरच्या ग्रामीण व शहरी भागासह महाराष्ट्रातील बहुतांश समाज एकनिष्ठतेने त्यांच्याशी निगडित व कार्यरत आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. या प्रशंसनीय कार्याच्या माध्यमातून लाखो जन-माणसांच्या हृदयात स्थान असलेले छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे “तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे” हे स्वप्न साकार करता येते असे प्रतिपादन शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांनी केले.ते भिलेवाडा येथील श्री दादाजी धुनिवाले मठात आयोजित संस्कार चळवळ व गांधी विचार मंच भंडारा यांच्या वतीने संस्कार शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री दादाजी धुनिवाले देवस्थान पंचकमेटीचे संचालक प्रतिकुमार टांगले, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, रघुनाथ तुरस्कर, संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर, शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे यांनी मानले.

संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी डिगांबर टांगले, वैभव चेटुले, आरोही गोस्वामी, आर्या सुखदेवे, प्रिया वाघाये, आराध्या गोस्वामी, क्रिश वाढई, जय खवास, आरोही रामटेके, प्रशांत कुंभारे, समिक्षा बांडेबुचे, क्रिश येवले, सुजल वाघाये, डिकेश गाढवे, माही ठवकर, त्रिशा धोटे, डेयानी वाघाये, अक्षदा गणवीर, रिया घरडे, शौर्य पिपळशेंडे, सिध्दांत रामटेके, ऋतज शामकुवर, दिपांशु येवले, रूणी बांडेबुचे, नाविका गाढवे, माही बांडेबुचे इत्यादी संस्कार शिबिरातील विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved