शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख-अमृत नखाते यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी हे गांव सुरबोडी- सोंद्री – पिंपळगाव – अर्हेर नवरगाव – नान्होरी – तोरगाव- बाम्हणी या बायपास राज्यमार्गावर आहे. सदर मार्गामुळे गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी प्रभावित झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेत जमिनी सदर राज्य मार्गात गेल्यामुळे सरकाराने शेतकऱ्यांना जागेचा मोबदला देणे गरजेचे होते. शासनाने शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, रोडचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. परंतु शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. सदर कामसुध्दा निकृष्ठ दर्जाचे केले असून नाली बांधकामात पाईप, सिमेंट काँक्रेटींग न करता साध्या मुरुमाने बुजवले आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूने नाल्या केल्या नसल्यामुळे रोड वरील साचलेले पाणी पूर्ण शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पाऱ्ह्याची नुकसान झाली आहे. या पुढेही शेतीची नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीला काही नुकसान झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहिल. शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा. रोडच्या दोन्ही बाजूला तात्काळ नाल्या काढण्यात याव्यात. तसेच निकृष्ठ कामाची चौकशी करुन संबंधीतावर योग्य कारवाई करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्यामार्फत प्रेषित करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांनी सदर निवेदनाची दखल घेत नायब तहसीलदार यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे सर्वे करण्यासंदर्भात तात्काळ आदेश दिले.यावेळी नान्होरी गावातील शेतकरी तथा उपसरपंच संजय शेंडे, सरपंच शुभांगी राऊत, डॉक्टर रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख शिवसेना ब्रम्हपुरी, केवळराम पारधी उपतालुका प्रमुख शिवसेना ब्रम्हपुरी, अमित मेश्राम, भजनदास शेंडे, दामोदर तलमले, तलमले महाराज, श्रीधर मेश्राम, भाऊराव कोलते, रघुनाथ मेश्राम, आनंदराव राखडे, जागेश्वर राखडे, संदीप कामडे, अरविंद मेश्राम, महादेव प्रधान, ज्ञानेश्वर राखडे, नारायण राऊत, घनश्याम राखडे आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.