तहसिलदार अमित भोईटे-यांचा परवानाधारकांना इशारा
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-पिक विमा योजनेत नोंदणी करीत असतांना सिएससी केंद्र चालकाविरुद्ध शेतकऱ्यांकडुन तक्रार येत असल्याने सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडुन केवळ एक रुपया भरुन पिकविमा भरुन घ्यावा.अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येऊन परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती राळेगाव तहसिलदार अमित भोईटे यांनी दिली आहे. सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात सन २०२३-२४ पासुन सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्यात येत असुन शेतकऱ्यांना प्रतिअर्ज १/-रुपया शुल्क भरुन पिकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. या योजने अंतर्गत जोखमीच्या बाबीचा समावेश केला.
असुन त्यामुळे हवामान घटकाच्या प्रतिकुल परीस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परीस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणी पासुन ते पिक काढणी पर्यतच्या कालावधीत नैसर्गीक आग,विज कोसळने,गारपिट,वादळी चक्रीवादळ,क्षेत्र जलमय होणे,भुस्सखलन,दुष्काळ,पावसातील खंड,कीड व रोग या बाबीमुळे पुर हंगामाच्मा शेवटी उत्पनात होणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान नैसर्गीक कारणामुळे पिकांचे काढणीपश्चात नुकसान या बाबीचा समावेश आहे.
पिकविमा नोंदणी करणेकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटर,आपले सरकार केंद्र, तसेच ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र, आणि सेतु सुविधा केंद्र यापैकी कोणत्याही केंद्रात ७/१२ व आवश्यक कागदपत्र घेऊन जाने गरजेचे आहे. सदर पिकविमा अर्ज भरण्याची अंतीम तारीख दिनांक ३१ जुलै २०२३ ही असल्याने राळेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पिकविमा योजनेत सहभाग घ्यावा.
असे आवाहन राळेगाव तहसिलदार अमित भोईटे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ई-पिकपाहणी प्रकल्प अंतर्गत ई-पिक या मोबाईल अँपव्दारे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वताच्या मोबाईलमधुन करु शकतात तरीई-पिकपाहणी या मोबाईल अँपमधुन सर्व शेतकऱ्यांनी पिकपेर्याची नोंद करावे असे आवाहन देखील राळेगाव तहसिलदार अमित भोईटे यांनी केले आहे.