Breaking News

अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित एक रुपयात पीक विमा काढून घ्या – जिल्हाधिकारी विनय गौडा

सुविधा केंद्रावर शेतक-यांशी संवाद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 17 : राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 जुलै आहे. मात्र अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतक-यांनी एक रुपयात त्वरीत पीक विमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ग्राम पंचायतीमध्ये असलेल्या सुविधा केंद्रावर शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, उपजिल्हाधिकारी स्नेहल रहाटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नगदेवते, तहसीलदार शुभम बहाकर, उपविभागीय कृषी अधिकारी, गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी पानसरे तसेच शेतकरी उपस्थित होते.

शासनाने सुरू केलेल्या केवळ ‘एक रुपयात पीक विमा’ या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंतिम तारीख 31 जुलै असली तरी ऐन वेळी घाई टाळण्यासाठी शेतक-यांनी पुढे यावे. स्वतःच्या मोबाइलद्वारे पीक विमा काढणे सहज शक्य आहे. अन्यथा नजीकच्या बँक, सुविधा केंद्रावर जावे. विविध नैसर्गिक आपत्ती, कीड रोग ई अशा अनेक कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने सन 2023-24 मध्ये केवळ एक रुपयात पीक विमा लागू केली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी रामू बालूगवार, गणपती येगगेवार यांना पीक विमा काढून देऊन त्यांच्याकडे सुपूर्त केला.

जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 4लक्ष 70 हजार 827 हेक्टर क्षेत्र कापूस, सोयाबीन, तुर, भात इ . मुख्य पिकांच्या लागवडीखाली असते. जिल्ह्यातील 3 लक्ष 61 हजार 791 खातेदारांनी केवळ एक रुपयात पीक विमा काढून घ्यावा. यासाठी 7/12 उतारा, 8अ, आधार कार्ड, बँक खाते आणी पीक असलेचे स्वयंघोषणापत्र ई कागदपत्र आवश्यक आहे.

ई-पिक पाहणी करून सातबाऱ्यावर पीक पेरा नोंद करा : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोंडपिपरी तालुक्यातील मौजा बोरगाव येथे मोबाईल अॅप द्वारे ई-पीक पाहणी करून सातबाऱ्यावर पीक पेरा नोंद करण्यासाठी शेतकऱ्याना आवाहन केले. यावेळी कृषी सहाय्यक आर. डी. निकोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांना मोबाईल वर पीक पेरा नोंद करण्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. ई- पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठयाकडे न जाता स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या सातबारावर विविध पिकांची नोंदणी करणे शक्य झाले आहे.

खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणी साठी ई- पिक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी 1 जुलै 2023 पासून सुरू झाले आहे. जिल्हयातील शेतक-यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीत आपली ई- पिक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा विशेष करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, असे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved