जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे गावकऱ्यांच्या हितार्थ जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर झाली पण वडकी हे गाव खोलगट भागात असल्याकारणाने 6 ते 7 वर्षाच्या कालावधीनंतर निर्माण झालेली शिवनगरी हे उंचावर आहे, येथील ग्रामपंचायत ने शिवनगरी येथील लेआउट मालकाने नियमाप्रमाणे सोडलेली खाली जागा ही ग्रामपंचायत वडकी यांना सुपूर्द केली.
आता ती जागा ग्रामपंचायत च्या मालकीची आहे म्हणजेच शासनाच्या मालकीची असल्यामुळे आणि सर्व गावाकऱ्यांच्या हितासाठी त्या जागेचा उपयोग व्हावा याकरिता ग्रामपंचायत ने जल जिवन मिशनच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु केले असता या खाली जागे लगतच असलेल्या खासगी शाळेच्या मालकाने आपला विरोध दर्शविला असून पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यासाठी अडथळा निर्माण केला व दोन दिवसापूर्वी संस्था चालकाने प्रसार माध्यमाना बोलवून मी येथे पाण्याची टाकी होऊ देणार नाही व शाळेतील मुलांना याचा भविष्यात धोखा निर्माण होऊ शकतो अश्या प्रकारची भूमिका घेत मी या संदर्भात उपोषण सुद्धा करीत आहे असे माध्यमाशी बोलताना सांगितले.
अश्यातच येथील नागरिकांनी स्थानिक पत्रकार परिषद घेऊन संस्था चालकाला चांगलेच खडसावले ही जागा एकटीची नसून सर्व प्लाट धारकांची आहे व त्याचा सर्व हक्क हा ग्रामपंचायत ला आहे पाण्याची टाकी ही जनहितार्थ होईल नाहीतर सहा वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच राहील व गावकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागेल एवढेच नाहीतर खासगी शाळा स्मॉल वंडर हायस्कूल आणि कॉलेज च्या प्राचार्य कु. मंजुषा सागर यांनी पार्क (खाली जागेतील )बोरवेल सुद्धा स्वतःच्या मालकीची असल्यासारखी बोरवेलमध्ये सबमरसीबल पम्प टाकून बोरवेलचे पाणी हे स्वतःच्या कामासाठी वापरत आहे.
एवढेच नाही तर त्या जागेवर होत असलेल्या कार्यक्रमाचे पैसे सुद्धा हे संस्था चालक घेत असल्याचे माध्यमाशी बोलताना गावकर्यांनी सांगितले.यावेळी गावकर्यांनी आक्रमक होत येथे पिण्याच्या पाण्याची टाकी नाही झाली तर आम्ही आंदोलन करू संस्था मालकाचा संबंध नसताना सुद्धा शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप सुद्धा येथील नागरिकांनी केला, तरी या विषयावर संबंधित ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.