वनविभागाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष
एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात उभ्या पिकात रोहयाचा आणि रान डुक्करचा धुमाकूळ
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात रोह्याच्या आणि डुकराचा कळपाने शेतात उभ्या पिकात धुमाकूळ घातला आहे आधीच शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे पिक खरडुन गेले आणि पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे अश्या परिस्थितीत शेतात वाढणाऱ्या पिकांमध्ये वन्यप्राण्यांच्या प्रार्दुभाव वाढल्याने शेतकऱ्यां समोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या पिकांच्या नासाडीने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास जाण्याच्या भीतीने व आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या उमरवीरा येथील पारधी बेड्या वरच्या रहिवासी शालू उर्फ शालूरंगा अमित पवार (४०) या महिलेच्या शेतातीत पूर्ण उभे कपासी पिक रोहि व रान डुक्कर या वन्य प्राण्यांनी खाल्ल्याचे त्यांना १२ ऑगस्ट रोजी शेतात गेल्यावर दिसल्याने त्यांनी निराश होऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती एवढी मोठी घटना घडून सुद्धा वन विभागाला जाग आली नाही,
आणखी किती शेतकऱ्याचा बळी घेणार राळेगाव तालुक्यात एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात उभ्या पिकात रोहयाचा व रान डुकराचा कळपाने धुमाकूळ घालून पिकाची नासाडी करत आहे त्यामुळे शेतकरी खुप त्रस्त आहे तेव्हा वन विभागाने तात्काळ वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.