जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674
(भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात आयोजित संस्कार शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला ,कार्यक्रमाला संस्कार शिबिराचे प्रमुख विलास केजरकर, महाराष्ट्र अंनिस बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे, दादाजी धुनिवाले देवस्थान पंचकमेटीचे प्रतिकुमार टांगले, यशवंत बिरे, वैभव चेटुले, चंद्रशेखर खोब्रागडे, राहुल मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी योग- प्राणायाम, विलास केजरकर यांनी बौद्धिक खेळ यावर सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच आजचे युग हे विज्ञानवादी आहे. मानवी जीवनाच्या विकासासाठी प्रत्येकाने विज्ञानवाद, विकेवादी, विचारवादी होऊन प्रत्येक गोष्टी मागे असलेली कारणे तपासली पाहिजे. त्याची चिकित्सा केली पाहिजे.तेव्हाच मानवी जीवनाचा विकास होतो नाहीतर माणूस अंधश्रद्धेला बळी पडतो. कारण अंधश्रद्धा ही मानवी जीवनातील मोठा अडथळा आहे.
म्हणूनच अंधश्रद्धामुळे मानवी जीवनाचा विनाश होत यांची विविध कारणे महाराष्ट्र अंनिस बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे यांनी सांगून पाण्यात कापूर पेटवणे, लोव्ह्याची लंगर सोडविणे, तांदळाचा भरलेला लोटा उचलणे, बाबांचा तीर्थ पुरविणे, प्रश्नचिन्ह असे विविध प्रयोग करून दाखविले व त्या मागील असलेले कारण समजावून सांगितले. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे यांनी मानले.संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ तुरस्कर, डिगांबर टांगले, आरोही गोस्वामी, आर्या सुखदेवे, प्रिया वाघाये, आराध्या गोस्वामी, क्रिश वाढई, आरोही रामटेके, प्रशांत कुंभारे, जय खवास, समिक्षा बांडेबुचे, क्रिश येवले, सुजल वाघाये, डिकेश गाढवे, माही ठवकर, त्रिशा धोटे, प्रणाली शक्तीकर, डेयानी वाघाये, अक्षदा गणवीर, रिया घरडे, शौर्य पिपळशेंडे, सिंध्दात रामटेके इत्यादी संस्कार शिबिरातील विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.