Breaking News

शेतकरी आत्महत्येची 20 प्रकरणे मदतीकरीता निकाली

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 25: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 29 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 20 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित एक प्रकरण फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, कृषी उपसंचालक चंद्रकात ठाकरे, नायब तहसीलदार(सामान्य) गिता उत्तरवार, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम, जिल्हा अग्रणी बँकेचे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 29 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 20 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. तर उर्वरित एक प्रकरण समितीने फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved