Breaking News

युद्ध नको,जगाला बुद्ध हवा – अशी शिकवण देणारे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर-राहुल डोंगरे

शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा) :- बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान द्रष्टे नेते व युगपुरूष होते.समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे.अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी देशात व परदेशात शिक्षण घेतले.शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश भारतीय समाजाला दिला.’ युद्ध नको, जगाला बुद्ध हवा ‘ अशी शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच होते,असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित डो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वासुदेव चरडे होते.

सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.राम बोपचे, लिझा हेडाऊ,विपसी बागडे,कादंबरी वैद्य,सृष्टी मोहतूरे,अमन सोनवाणे यांनी ‘ सहा डिसेंबर छेप्पन साली,वेळ कशी ती हेरली,दुष्ट काळाने भिमरायाची काळज्योत ती चोरली ” या सामूहिक गीतातून अभिवादन केले.अमन सोनवाणे ,सृष्टी मोहतूरे,कादंबरी वैद्य,विपसी बागडे,राम बोपचे, लिझा हेडावू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक पैलूवर विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी वासू चरडे यांनी “भिमराया कधी येशी भेटावया,जन्म घे तू पुन्हा हे महामानवा’ या गीतातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून श्रद्धांजली वाहिली.

प्रमुख वक्ते राहुल डोंगरे पुढे म्हणाले की, बुद्धिसम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर सामाजिक क्रांतिकारक होते.भारतातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेब आग्रही होते.त्यांनी त्यासाठी भारतीय राज्यघटनेत विविध तरतुदी केल्या.त्यामुळेच आज महिलांना सर्वच क्षेत्रात प्रगती,उन्नती आणि विकासाच्या चौफेर संधी उपलब्ध होत आहेत.राष्ट्रीय प्रेमाने झपाटलेल्या या प्रज्ञासुर्यास,सच्चे लोकशाहीवादी,प्रखर विज्ञाननिष्ठ दीपस्तंभाचे भारतीयांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे.तरच खरे राष्ट्रहित जोपासता येईल,असे परघड मत यावेळी व्यक्त केले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत विभोर निखाडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे संचालन कु. यशस्वी नवखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. श्रावणी मोहतुरे यांनी केले.पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबिरप्रसाद आग्रवाल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रूपा रामटेके,प्रा.माधवी खोब्रागडे,प्रा.नवीन मलेवार , नितुवर्षा घटारे,प्रीती भोयर,सीमा मेश्राम,संजय बावनकर,श्रीराम शेंडे,अशोक खंगार, रुपराम हरडे,प्रशांत जीवतोडे, अंकलेष तिजारे,नलिनी देशमुख,नारायण मोहनकर, झंकेश्वरी सोनेवाणे यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 …

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved