शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे प्रतिपादन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडार)-दिनांक 6 डिसेंबर 2023 ला शांतीवन बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २ अभिवादन करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली . यावेळी प्रमुख मार्गदर्शक संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,ज्या भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, शोषित,पीडित समाजाला न्याय देण्याचे काम केले.
आपल्याला आण,बाण, शाण सर्वकाही दिले त्या बोधिसत्व, विश्वभूषण ,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य साक्षीत आहेत तोपर्यंत सहीसलामत कायम राहणार असल्याचे प्रतिपादन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रामनेर बुद्धपाल हे होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते निकेतन वानखेडे, अंबादास मेश्राम, प्रमोद बिलवणे ,राजकुमार सयाम, कैलास राऊत ,राजकुमार कुर्जेकर ,अशोक डोंगरे व इतर कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.