Breaking News

वाडीतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील अबँकस परीक्षेत यश

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी

वाडी(प्र):-योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास होऊन यश संपादन करता येते, याचे ताजे उदाहरण वाडीत पाहायला मिळाले. वाडी परिसरात असलेल्या एसआयपी अबॅकस वाडीचे संचालक संतोषजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक परिश्रमाने वाडीतील १६ विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे झालेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली, या विजयाने विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक शिक्षक आणि वाडीवासीयांचे नावलौकीक केले.

या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी रियांश डुले (प्रथम रनर अप), मृणाली रामभाडे द्वितीय तर सम्यक टेभुर्णे, ऋषिका कोरे, धृती चव्हाण, नमन सगणे, स्वरा लांजेवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय श्रेयांश चव्हाण, चैतन्य बोबडे, तीलक माहेश्वरी, मनस्वी अवचट, हर्षल देशमुख, द्राक्षी मेश्राम, निमय देवासे, रौनक रघटाटे, त्रिकांश राघोरे या सर्व ९ विद्यार्थ्यांना बेंच मार्क अवॉर्ड मिळाला. एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सर्व विद्यार्थी यशस्वी झाले. आणि एस.आय.पी संस्थेचे नाव लौकीक केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved