तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई करीता प्रहार सेवक विनोद उमरे यांची निवेदनातून मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय.चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे…. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.चिमूर येथिल प्रहार सेवक यांनी शेतकरी राजांवर संकट येताच शेताची पाहणी करुन अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांना निवेदन देऊन पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.जर तात्काळ पंचनामे आपल्या स्तरावरुन न झाल्यास प्रहार संघटनेमार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून प्रहार सेवक विनोद उमरे,संदीप ठवरे,विजू निकोसे यांनी दिला.