प्रकरण साडेदहा वाजले तरी वेतन पथक कार्यालयाचे कुलूप बंदच
जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा) – येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन व आर्थिक व्यवस्था म्हणून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) भंडारा कार्यालया मार्फत सुरु आहे.सध्या स्थितीत या कार्यालयात आर्थिक गैव्यवहारप्रकरणी कोणत्याही तक्रारी नाही पण काही संघटनेचे पदाधिकारी गैरमार्गाने नियम बाह्य कामे करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करतात पण नियम बाह्य कामे होत नसल्याने कार्यालयातील कर्मचारी कामावर सकाळी 9.45 ला कार्यालयात उपस्थीत असतांना बाहेरचं गेट लोटून फोटो काढून साडे दहा वाजले तरी कार्यालयं बंदच म्हणून बातमी प्रकाशित करण्यात आली.
म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे यांनी अधीक्षक वेतन पथक यांना कारणे दाखवा नोटीस बजावले त्यामुळे वेतन पथक कार्यालयाला खुलासा सादर करावा लागला. त्या संबंधाने विचारणा केले असता नियम बाह्य कामे करू पहाणाऱ्यांनी सुड भावनेतून सदर तक्रार केल्याचे म्हटले आहे. सरकारी कार्यालयाच्या वेळे प्रमाणे वेतन पथक कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते 6.15 अशी आहे. मात्र 30 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत माध्यमिकचे वेतन पथक कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळले व जिल्ह्यातील खासगी शिक्षकांच्या वेतनाशी संबंधित माहितीकरिता शालेय कर्मचारी वेतन पथक कार्यालयाबाहेर – कर्मचाऱ्यांची वाट पाहत होते. मात्र – साडेदहा वाजल्यानंतरही कार्यालयाला कुलूप लागलेले होते. अशी खोटी माहिती देण्यात आली.
प्रसार माध्यमांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी नुकत्याच विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. बायोमॅट्रिक मशीनवरील नोंदी तपासून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज दिली असल्याची माहिती होती. पण जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी कधी दिवसा कार्यालयांत असतात काय? हे कधी बघितले नाही. मात्र, अधिनस्त असलेल्या वेतन पथकातील कर्मचाऱ्यांवर प्रभाव पडलेला दिसत नसल्याची टिका करण्यात आली आहे.मात्र जिल्हयातील सर्व विभागांचे सर्व कर्मचारी वेळेचे बंधन पाळतात की नाही . सर्वसामान्यांच्या कामासाठी बाहेर गावावरून आलेल्या लोकांची कामे करणारे अधिकारी कार्यालयात असतात काय?ही जबाबदारी जिल्हा प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांची आहे .या तक्रारी वरून जिल्हा प्रशासन सर्व विभागांचे कामे नियमीतपने होतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.