जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
भंडारा:-दिवाळीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांचे किल्ले तसेच इतिहास माहित व्हावा या उदेशाने तीन वर्षीय आराध्या शिंगोरे नी सज्जनगड व शिवनेरी किल्याची प्रतिकृती साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांचे किल्ले तसेच इतिहास माहित व्हावा या उदेशाने दाढी घराण्यात अनेक वर्षापासून किल्ले तयार करण्याची परंपरा आहे. मोहन दाढी यांना बालपणापासून किल्ले व मुर्त्या बनविण्याचा शौक आहे. दिवाळीच्या सुट्टीत दाढी कुटूंबातील बच्चे कंपनी दिवाळीसाठी भंडारा येथे आले की मोहन दाढी त्या सर्वांना घेऊन दरवर्षी नव-नवीन किल्ले बनविण्यास प्रोत्साहन देऊन स्वतः मेहनत करून त्यांच्याकडून किल्ला तयार करवून घेत असतात.
महाराष्ट्रात किल्ल्याचे विशेष महत्व आहे. म्हणुन मुलांना लहानपणा पासूनच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांचे किल्ले तसेच इतिहास माहित व्हावा या उदेशाने मनाली शिंगोरे यांनी आपल्या तीन वर्षीय आराध्या शिंगोरे हीला शिवरायांच्या किल्ल्याविषयी मार्गदर्शन केले. आराध्या ही पुणे वाघोली येथील रायझींग स्टार कॉन्व्हेंट मध्ये केजी वन ला शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी शिंगोरे कुटूंब सज्जनगड येथे गेले होते. त्या ठिकाणी तिला सज्जनगडा विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते.
आराध्या ही दिवाळीच्या सुट्टयात भंडारा येथे आबाजी मोहन दाढी यांच्याकडे आली असता तीने सज्जनगड व शिवनेरी या दोन्ही किल्याची मिक्स प्रतिकृती साकारली आहे. ती प्रतिकृती पाहण्याकरिता किल्याचे महत्व जाणणाऱ्यांनी भेट देत आराध्याचे अभिनंदन केले आहे.तसेच भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“आजच्या मुलांनी मोबाईल व टिव्ही यांच्या व्यतिरीक्त महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे कार्य, किल्ले व इतिहासाची माहिती देणे गरजेचे आहे”
*मनाली शिंगोरे,वाघोली पुणे*