Breaking News

शेवगाव शहराचा पाणीपुरवठा येत्या आठ दिवसात सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढणार पालिकेवर हंडा मोर्चा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव:-दिनांक 30 नोव्हेंबर गुरुवार शेवगाव शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीमती वसुधा सावरकर व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना निवेदन देऊन आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.याबाबत सविस्तर वृत कि, गेल्या कित्येक दिवसांपासून शेवगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अनेक भागांत दहा ते दिवसांनी पाणी येत आहे.यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडण्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

याबाबत शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील महीलांनी श्रीमती वसुधा सावरकर व तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली सौ.सविता भुजबळ,शैला बडधे, रुपाली क्षिरसागर,सिंधुबाई लोखंडे,बेबीताई मरकड, सुमन शेळके, मुक्ता पानखडे,शितल तुपे,ज्योती नांगरे,अनिता गुणवंत,गिता नांगरे,मिरा भडके,मनिषा मरकड आदी महिलांच्या शिष्टमंडळांने मुख्याधिकारी सचिन राऊत यांची भेट घेऊन महिलांच्या पाण्याबाबतच्या व्यथा मांडल्या. दहा ते पंधरा दिवसांनी होणा-या या पाणी पुरवठ्याने शहरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.कित्येक सर्वसामान्य कुंटूंबाकडे इतके दिवस पाणीसाठा करण्याकरिता व्यवस्था नसल्याने नागरिक घरात टाक्या,बकेट,भांड्यांमध्ये पंधरा दिवस पाणी साठवून ठेवतात. साठलेल्या उघड्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास, अळ्या होत असून नागरिकांना डेंग्यूची बाधा हाेत असल्याचे आढळून आले आहे.

यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या वितरण व्यवस्थेत आपण तातडीने लक्ष घालावे जेणे करुन शहराला किमान चार दिवसाला तरी पाणी पुरवठा होईल याबाबत तातडीने पावले उचलली जावीत.धरणातून मुबलक पाणी मिळत असुन ही हि परिस्थिती का निर्माण होत आहे याचा ही सखोल अभ्यास नगरपरिषदेच्या प्रशासनाने करणे आवश्यक असुन नविन पाणी पुरवठा योजनेचे सत्य नगरपरिषदेने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असुन टक्केवारीच्या व मलिद्याच्या खेळात सर्व सामान्य शेवगावकरांना वेठिस धरण्याचे काम किमान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तरी करू नये.

सामान्य शेवगावकर अंत्यत सहनशील असुन त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहु नये.धरण उशाला असुनही १५ दिवसाला पाणी पुरवठा होणारे हे देशातील पहीलेच शहर असावे,आमच्या माता भगिनिंना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडण्यांची परिस्थिती निर्माण होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन जबाबदार असुन या परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे जेणे करुन शहराला किमान चार दिवसाला तरी मुबलक पाणी पुरवठा होईल. तरी येत्या आठ दिवसात या परिस्थितीत आपण तातडीने सुधारणा न केल्यास शहरातील महिला भगिनींच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनात लक्ष्मीबाई तारु, सुजाता नाईक,रश्मी लाहोटी, सिमा गवते, सुरेखा जाधव,उषा सर्जे,रोहिणी तारु, कल्पना साबळे, संपदा शेळके,अंजली भुजबळ, रेखा गवळी, सुवर्णा दहिवाळकर,द्वारका शिंदे,शोभा शिंदे,सुनिता नांगरे,मोनाली कदम, मंगल धोंडे, वैशाली औटी यांच्यासह सुमारे नव्वद महिलांच्या सह्या आहेत, याप्रसंगी मंगेश लोंढे,गणेश डोमकावळे,अजिंक्य अधांरे, अमिन सय्यद,प्रसाद लिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved