जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
(भंडारा):- भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याबरोबर वेळप्रसंगी विविध पदांची जवाबदारी पाडणे गरजेचे आहे. त्याकरिता जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास सदैव बाळगणारे तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे डॉ. राजेंद्र प्रसाद होत. म्हणून नागरिकांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे आदर्श जोपासावे असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. एस. टी.बोंबार्डे यांनी केले.ते न्यु फ्रेंडस कॉलोनी येथे जनता सामाजिक व सांस्कृतिक विकास संस्था भंडारा च्या वतीने आयोजित स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती व अधिक्का दिवसानिमित्त बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ बन्सोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, हिरालाल बागडे, डॉ. एस. टी.बोंबार्डे , जनता सामाजिक व सांस्कृतिक विकास संस्थेच्या अध्यक्ष दिप्ती मेश्राम, गिरीधारी मेश्राम उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले.त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जिवन चरित्र व विविध प्रसंगावर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सचिव ज्योती डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कुमूद मेश्राम, शाक्य बोंबार्डे, जनता सामाजिक व सांस्कृतिक विकास संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.