जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर तालुक्यातील भक्तगण वारी पायदळ दिंडी रॅली निघाली चिमूर,अकोला ते शेगाव. वारीचे नेतृत्व हरीभक्त रामकृष्ण बंडे महाराज व नंदु कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी अनेक भक्तगण प्रभुच्या दर्शनासाठी भक्तीभावाने,गणगण गणात बोते या जय घोषात (दिंडी) रॅलीची सुरूवात करण्यात आली. प्रभुचे दर्शन घेण्यासाठी रॅलीमध्ये जवळपास १५० ते २०० भक्तगण असल्याची माहिती नंदु कामडी यांनी सांगितले आहे.