शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रतिपादन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674
(भंडारा) – संत शिरोमणी रोहिदासाच्या विचारधारेत ‘ मनुष्य ‘ हाच धर्माचा केंद्रबिंदू होता.धर्म हा मानवासाठी असून मानवांच्या सर्वागीण कल्याणासाठी धर्माने आपली भूमिका वठवावी,असे त्यांना अभिप्रेत होते.मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा त्यांची होती.केवळ अन्नाचा अर्थात पोटपाण्याचा विचार न मांडता,लहान – थोर, स्पृश्य – अस्पृश्य,गरीब – श्रीमंत यांच्यात समानता असावी.सर्वांना समान अधिकार असावेत.समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांचे बिजे समाजात रुजली पाहीजेत.जातीभेदाचे निर्मूलन झाले पाहिजे.राष्ट्रहित जोपासले पाहिजे.समाजाला आपल्या साहित्यातून जागृत करण्याचे कार्य संत रोहिदास महाराज यांनी केले आहे.ते खऱ्या अर्थाने समतावादी संत होते.असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने अध्यक्ष पदावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.एस.पी.भंडारा जिल्हा समादेशक वासू चरडे होते.संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्यावर यामिनी हट्टेवार,बालिका ठवकर, नेहनसी भोयर,पूर्वा सार्वे,भार्गवी बडवाईक,भावेश साखरवाडे,वंश माहुले,सक्षम भोंगाडे,मौर्य सेलोकर,समीर बाभरे, अथर्व बुरडे,पवन तांडेकर आदीनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन वेदिका भांडारकर यांनी केले.तर आभाप्रदर्शन प्रियंका भोंगाडे यांनी केले.पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबिरप्रसाद आग्रवाल,सचिव रामकुमार आग्रवाल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या मस्के,दिपक गडपायले,संजय बावनकर,श्रीराम शेंडे, नीतुवर्षा घटारे,प्रीती भोयर,सीमा मेश्राम,अशोक खंगार, रूपराम हरडे,प्रशांत जीवतोडे, अंकलेश तिजारे,नलिनी देशमुख, सुकांक्षा भुरे,नारायण मोहनकर,दिपक बालपांडे,झांकेश्र्वरी सोनेवाणे आदींनी विशेष सहकार्य केले.