श्री साई क्लासेस अकॅडमी येथे वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी:-कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असल्यास हार्ड वर्क व जिद्दीची आवश्यकता असते. तुम्ही विद्यार्थी आहात, वर्ग १० ची परीक्षा म्हणजे तुमच्या जिवणातील परीक्षांचा पहीला पडाव आहे. अशा वेळी फक्त वेळेचे महत्व समजून घ्या, वेळेला महत्त द्या. वाईट संगत सोडून मि विद्यार्थी आहे व माझे कर्तव्य फक्त अभ्यास करने आहे याची जाणीव ठेवा मग पहा की कोणतीही परीक्षा तुम्हाला कठीण वाटवार नाही. असे वक्तव्य प्रा. राजु आष्टणकर यांनी केले.भिसी येथील श्री साई क्लासेस अकॅडमी तर्फे वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रा.आष्टणकर पुढे म्हणाले की श्री साई क्लासेस अकॅडमी कोळशाच्या खानी मधून विद्यार्थ्यांच्या रूपात हिरे शोधण्याचे कार्य करते.दरवर्षीची उत्कृष्ट निकालाची परंपरा बघता यावर्षी सुध्दा ती परंपरा कायम राखणार अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कृष्णाजी तेजने यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात ते म्हणाले की विद्यार्थीनी स्वप्न बघा व ति पूर्ण करण्याचे ध्येय्य ठेवा व ते ध्येय्य गाठा. यासाठी वेळेवर कसा व किती अभ्यास करायचा याचे सुत्र त्यांनी सांगीतले. तसेच वेळ निघून गेल्यावर काहीच करू शकत नाही म्हनून परीक्षेच्या वेळापत्रकानुसर अभ्यासाचं सुध्दा वेळापत्रक बनवून अभ्यास करण्याचा मौलीक सल्ला त्यांनी दिला.या कार्यक्रमात वर्ग १० च्या विद्यार्थ्यांनी सुध्दा आपले अनुभव व्यक्त केले. प्रा.सुधाकर निमजे, प्रा. प्रफुल जांभुळे, प्रा. प्रगती कुमले तसेच कार्यक्रमाला उपस्थीत पालक पत्रु बेले, अशफाक पठाण यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कृष्णाजी तेजने, प्रमुख अतीथी प्रा.राजु आष्टणकर,पालक पत्रु बेले,अशफाक पठाण,पंकज मिश्रा,जयंत राऊत,प्रा.सुधाकर निमजे, प्रा.प्रफुल जांभुळे,प्रा.राहुल रेवतकर,रमेश खेरे,प्रा.प्रगती कुमले तसेच वर्ग 8 ते 11 वी चे विद्यार्थी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे संचालन श्री साई क्लासेस अकॅडमीचे संस्थापक प्रा. गणेश गभणे यांनी केले.प्रास्ताविक प्रा.प्रगती चामाटे व प्रा.राहुल रेवतकर यांनी उपस्थीतांचे आभार व्यक्त केले.