चंद्रपूर जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-सामाजिकता सोडलेल्या व मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना देशाच्या मणिपूर राज्यात घडत असून सम्पूर्ण देशभरातून त्याविरोधी आवाज निदर्शने उठविली जात आहेत. महिलेला सर्वोच्च दर्जा आहे अशी संस्कृती मानणाऱ्या देशात महिलेलाच भर रस्त्यावर उघडे नागडे करून त्यांची धिंड काढणे व त्यावर पाशवी बलात्कार करणे यामुळे संस्कृतीचेही धिंडवडे निघाले आहेत. महिलांनी जागृत होऊन नेमक्या कोणत्या संस्कृतीचा स्वीकार करावा हे ज्याचे त्यांच्यावर जरी सोडले तरी संवैधानिक मार्गाचा वापर करून स्त्री पुरुष समानता तसेच महिला सक्षमीकरन यावर भर देणाची गरज निर्माण झाली आहे. महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने मणिपूर येथील आदिवासी समाजातील मिहिलांची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्कार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
*चंद्रपुर महिला मुक्ती मोर्चा पदाधिकारी*
त्याकरिता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड मदन भैसारे, शहर अध्यक्ष श्वेता ताई फंदी,सदस्या वैशाली शेंडे,सीमा वानखेडे,मीना कुंभरे,पूजा कायरकर,ज्योती भोगेकार,लक्ष्मी ताई तावाडे, प्रतिभाताई मडचापे व महिला मुक्ती मार्च प्रती जिव्हाळा असणारे अशोक बुरांडे संतोष नवघरे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.