Breaking News

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल चिमूरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इयत्ता पाचवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.साने गुरुजींचे जीवन चरित्र,श्यामची आई यापैकी एका विषयावर विद्यार्थ्यांना सुवाच्य अक्षरांत लिहून किंवा टाईप करुन किंवा पीडीएफ करुन निबंध कैलाश बोरकर ८३७८०९१५२५ या व्हाटसअप्प क्रमांकावर १५ सप्टेंबरपूर्वी पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

निबंध स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असून यांत प्रथम क्रमांक १००१ रुपये,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,पुस्तक देण्यात येणार आहे.द्वितीय क्रमांक ७०१ रुपये,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक तसेच तृतीय क्रमांकाला ५०१ रुपये,सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देण्यात येणार आहे.दोन्ही गटात पाच प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात येणार आहे.निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त शाळा आणि विदयार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,जिल्हा कोषाध्यक्ष रामदास कामडी,चिमूर तालुका कार्याध्यक्ष कैलाश बोरकर, हरी मेश्राम,इम्रान कुरेशी,नितीन पाटील,आशिष वाघमारे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved