जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सोयाबीन चे पीक संकटात आले आहे.येलो मोझॅक रोगामुळे एैन शेंगधरणीच्या वेळेवर सोयाबीनची झाडे वाळली आहे.गेल्या काही वर्षापासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमनामुळे पुन्हा संकटात सापडले आहे.सोयाबीन चे काहीच उत्पन्न होण्याची शक्यता नसल्याने चिमूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी५०हजाराची मदत देण्याची मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.चिमूर तालुक्यात सोयाबीनची सर्वाधिक लागवड केली जाते.यावर्षी सुध्दा शेतक-यांनी सोयाबीनची लागवड मोठया प्रमाणात केली आहे.या खरीप हंगामात सोयाबीनवर मोठया प्रमाणात येलो मोझॅक चे आक्रमन झाले आहे.
या रोगाने सोयाबीनची झाडे वाळत आहे. शेंगधरणीची वेळ असल्याने रोगाचा प्रादुर्भाव घातक ठरत आहे.त्यामुळे अशा गंभीर संकटात शेतकरी मात्र दिशाहीन झाल्याचे दिसून येत आहे.कृषी विभाग तसेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरले आहे. लागवडीचा खर्च वाढलेला असतांना.त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करुन सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी 50 हजाराची मदत देण्याची मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे यांनी केली आहे.न्यायालयात दाद मागणार चंद्रपूर जिल्हयातील चिमूर तालुक्यातील शेतक-यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले.सरकारने मात्र अजुनही शेतक-यांना मदत दिलेली नाही. आता तर सोयाबीन उत्पादक शेतकरी सुध्दा उदध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करुन मदत न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करुन सरकारला जाब विचारण्यात येईल. एवढेच नव्हे तर सोयाबीन कंपनी, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यावर न्यायालयात खटले भरु असा इशारा सुध्दा विनोद उमरे यांनी दिला आहे.