जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा विरगाव हे अति दुर्गम आदिवासी मागासवर्गीय खेडे गाव आहे विहिरगाव येथील लोकसंख्या अंदाजे १५०० असून त्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप प्रमाणात आहे वीहिरगाव मध्ये रोजगाराच्या अन्न दुसरा कोणताही साधन नाही त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणे यासाठी रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे.
विहिरगांव येथे वन विभागाच्या वतीने पर्यटन गेट झाले तर येथील सुरक्षित बेरोजगार युवकांना काम मिळून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्न सुटू शकतो विहिरगाव येथील जंगल ताडोबा उद्यानाला लागून आहे व त्यात बेलारा, गोणमोहाडी, व मदनापूर,कोलारा, येथील पर्यटक विहिरगाव येथील जंगलात सफारी साठी येतात या जंगलाचा फायदा इतर पर्यटन गेट घेत आहेत तरी जंगल विहिरगाव आणि त्याचा फायदा इतर पर्यटन गेटला मिळत आहे म्हणून गावकऱ्यानी विहिरगांव येथे पर्यटन गेटची मागणी केली आहे या मागणीचे निवेदन आज विहीरगांव येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ.सतिश वारजूकर यांना दिले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.विजय पाटील गावंडे, तालुका उपाध्यक्ष रहमान पठाण सुभाष बनसोड,किसन दांडेकर, सरपंच शितल मुंडरे,उपसरपंच मधुकर गजबे, व गावातील बेरोजगार युवक उपस्थित होते.