Breaking News

विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार वाकलेले विद्युत खांब जीव गेल्यावर बदलणार काय – आशीष बोरकर यांचा सवाल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील चक जांभूळवीरा ते कन्हाळगाव रोडवरील मार्गावर असलेले विद्यूत खांब वाकलेल्या स्थितीत असून याकडे मात्र भिसी विभागीय महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच सदर वाकलेला विद्युत खांब कधीही रस्त्यावर किंवा शेतात पडेल याची शाश्वती देता येत नाही .

विद्युत महावितरण कंपनीला गांभीर्य काय एखाद्याचा जीव गेल्यावर संबधित खात्याला जाग येईल काय ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आशिष बोरकर यांनी केला आहे . हा वाकलेले विद्युत खांब रस्त्याच्या बाजुला आहे व रस्त्याने रोज शेकडो विद्यार्थी व नागरीक ये-जा करीत असतात अशा वेळी वाकलेले खांब कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो यास जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी नागरिक करतांना दिसत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved