Breaking News

नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणा-या भारतातील राष्ट्रीय कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड झाली आहे. यात भारतभरातून विविध शाळा, महाविदयालयातील विदयार्थी गण उपस्थित राहणार असून त्यांना भारतातून विविध सायबर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात अॅड. भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून भूमिका मांडणार आहे. सदरील राष्ट्रीय सायबर सेक्युरिटी कॉन्फरन्स, नाशिक चॅप्टरचे आयोजक स्वरदा कखनुरकर (व्हाईट बॅण्ड असोसिएटस्) यांनी आयोजित केली आहे. सदरील राष्ट्रीय कॉन्फरन्स येथे श्री. तपनकुमार झा, रिध्दी सोरल व दीपक राज राव,दिल्ली हे या सायबर तज्ञांचा देखील समावेश असणार आहे. सदरील एकदिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये संपुर्ण भारतातून आलेल्या विदयार्थी, डॉक्टर, इंजिनिअर्स, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरीकांना अॅड. भंडारी हे मार्गदर्शन करणार आहे तसेच त्यांना सायबर सेक्युरिटी विषयी ज्ञान देणार आहे, म्हणून नागरीकांनी मोठया संख्येने या राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये उपस्थित राहून सायबर सुरक्षिततेसंबंधी जागरुक रहावे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved