Breaking News

जिल्ह्यात 25 जुलैपासून ‘हर घर जल’ विशेष मोहीम

2 ऑगष्टला विशेष ग्रामसभा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 28 जुलै : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात दि. 25 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर जल’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 2 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली.

डॉ. सेठी म्हणाल्या, जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत 100 टक्के वैयक्तीक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणा-या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबाना प्रति दिन प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे शुध्द व शास्वत पाणी पुरवठा प्रदान करणे आहे.

या उपक्रमात विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत ‘हर घर जल’ घोषित करण्याचा ठराव करणे, त्यानंतर गावात समारंभ घेउन ‘हर घर जल’ उत्सव साजरा करणे, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, जनजागृतीसाठी पथनाटयांचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी एफटीके कीटव्दारे पाणी नमुणे तपासणी विशेष मोहीम राबविणे, हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी घटकांना सहभागी करुन घेणे.

संस्थात्मक नळजोडणीमध्ये ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे गावचे सरपंच , ग्रामसेवक, पदाधिकारी , सामाजिक संस्था व लोककलावंत यांनी हर घर जल उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved