जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-सन२०२१-२२ वसन २०२२-२४ या दोन्ही वर्षात रोगराईमुळे अती पावसामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अग्रमी ५०टक्के पिक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली आहे .या वर्षाची पावसामुळे रोगराईमुळे सोयाबीन,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा.मागील वर्षी अती पावसामुळे सर्व पिकनष्ट झाली होती. तर यावर्षी तीच परिस्थिती उंबावली आहे. सोयाबीन पिकाला करप्या रोग लागलेला आहे.तर काही पिक अतिवृष्टीमुळे मातीमोल झाली आहे.पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अग्रमी ५० टक्के पीक विमा नुसकान भरपाई देण्याची मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.