उत्पादनातही मोठी घट: सरकारने सोयाबीन भावातही केली मोठी उत्तरण? सरकार शेतकरी विरोधी आहे काय?शेतकरी यांच्यात मोठा रोष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर:-चंद्रपूर जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.दोन वर्ष पूर्वी सोयाबीनला उच्चांकी मिळाला होती.त्यामुळे अनेक शेतकरी यांनी या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती.तर सोयाबीन पिकाला चांगले दर मिळेल अशी आशा होती.पण सोयाबीनच्या दरात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.सोयाबिच्या पिकांचे भाव घसरले मात्र सोयाबीन काढणीला भाव वाढले आहेत.गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते .
यावर्षी तर दसरा दिवाळीला गोड धोंड करण्यासाठी चार पैसे येथिल असे वाटले असतानाच पावसाने दोन महिने वास्तव्य केल्याने पिकांवर यलो मोझॅक रोग पडल्याने सोयाबिन पिक करपून गेले.त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असून अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र सोयाबीन पिक उत्पादनात मोठी घट झाल्याने व सोयाबीन पिकाच्या भावात सरकारने मोठी उत्तरणं केल्याने शेतकरी राजा मोठा हवालदिल झाला आहे.सरकार शेतकरी विरोधी आहे काय?शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.