जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण
भंडारा:-26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाने अधिकृतपणे राज्यघटनेचा स्वीकार केला म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्य्क शिक्षिका कु. सुषमा गजभिये, मालू भोयर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संविधानावर गीते सादर केली व उत्कृष्टपणे भाषण सुद्धा सादर केले. यामध्ये कु. वेदिका गाडेकर, श्रुती गजभिये, संघप्रिया वाहाने, ज्योती निकुडे, खुशी वरखडे,कुमारी रंगारी, कुमारी भानारकर यांनी संविधान दिवसाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले.ह्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सावरकर यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले तर सहाय्यक शिक्षिका कु. गजभिये यांनी संविधान निर्मिती व कायदे यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सहाय्यक शिक्षक अश्विन दिघोरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कनिष्ठ लिपिक देवानंद देशमुख, परिचर मधुकर पुरामकर, रामचंद्र आत्राम व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.