राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर चे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आर्य वैश्य व कोमटी समाजाला ओबीसीत मागासवर्गीय ठरविण्यासाठी आ.क.पाटील सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्या पत्रानुसार उपसमिती १२व१३ मार्चला राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डाॅ.गोविंद काळे व डॉ.श्रीमती नीलिमा सरप यांनी दोन दिवसांची क्षेत्र पाहणी व वैश्य, आर्य व कोमटी समाजाच्या मागासलेपणा सिध्द करण्यासाठी दौरा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.आर्य, वैश्य व कोमटी समाज यांचा व्यवसाय व्यापार असून त्यामध्ये त्यांची उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
त्यांची गणना शेकडो वर्षांपासून व्यापारात आहे.सामाजिक व आर्थिक दृष्ट्या पुढारलेल्या आहेत.१५(४),१६(४)१५(५) नुसार आर्य वैश्य व कोमटी समाजाला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेपणा ठरविण्यात येऊ नये. अन्यथा ओबीसी समाज पेटून उठेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका कडून तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले असून राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे,रामदास कामडी,कवडू लोहकरे, रामभाऊ खडसिंगे, श्रीहरी सातपुते,सविता चौधरी,प्रभाकर पिसे,ईश्वर डुकरे,राजकुमार माथुरकर, ताराचंद बोरकुटे यावेळी उपस्थित होते.