Breaking News

शहराचे नाव करा शहाजीराजे नगर

अहमदनगर शहराला व जिल्ह्याला नामांतराची नाही तर विभाजनाची गरज

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्तांनी शहराचे नाव बदलण्याचा ठराव मांडला वास्तविक पाहता गेली दोन वर्ष सभागृह अस्तित्वात नाही शहराचे नामांतराचा घाट लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी नामांतराचा घाट घातला जात आहे परंतु शहरासह जिल्ह्याला अहमदनगर जिल्हा विभाजन करण हे अत्यंत महत्वाची गरज आहे.क्षेत्रफळाने लोकसंख्येने महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थानी असलेला 14 तालुके बारा विधानसभा मतदारसंघ दोन लोकसभा मतदारसंघ जवळजवळ 90 महसूल मंडळ 75 जिल्हा परिषद सदस्य असा अव्याढव्य कारभार असलेला गेली 30 ते 35 वर्षे अहमदनगर जिल्ह्याला विभाजनाची गरज असून उत्तरेत मुख्यालय संगमनेर करायचे की श्रीरामपूर या थोरात आणि विखे यांच्या सुंदोपसुंदी मध्ये विभाजन रखडले ते करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात असे कतृत्व वाण नेताच नाही हि एक शोकांतिका आहे.

ज्याची गरज नाही ते दिले जाते. जसे कि मराठा आरक्षण हे O.B.C. मधुन मागितले दिले मराठा म्हणून १०% टक्के ते घटनात्मक आरक्षण टिकू शकत नाही. अहमदनगर शहराच्या आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर जी मागणी नव्हती ती मागणी मागणी अहमदनगर जिल्हा विभाजन अशी होती गरज विभाजनाची तिन जिल्हा केले तर हे प्रशासकीय दृष्टीने योजना राबविण्यात साठी अत्यंत महत्त्वाचा विषय विभाजन हे नामांतर, वैगेरे वैगेरे विषय हे राजकारण मत मतदानचे फंडे आहेत.

*ताजा कलम*

शहाजीराजे आणि अहमदनगर जिल्हा आणि शहर यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे जिल्ह्याचे नामांतर करायचे असेल तर शहाजीराजे नगर असा करावा अशी मागणी रास्त ठरेल कारण शहाजीराजांच्या जन्मापासून अहमदनगर शहराचा संबंध आहे इतिहास तज्ञांनी धांडोळा घेऊन मराठा सेवा संघ आणि इतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेमी यांनी वारंवार अहमदनगर शहराचे नामांतर शहाजीराजे नगर करावे अशी मागणी जोर लावून करण्यास हरकत नाही

क्रमशः

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved