जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज नंदरा ते काग या पांदण रस्त्याचे काम हे खनिकर्म मंडळातुन करण्यात यावे या करिता सदर रस्त्यावरील शेतकरी यांनी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जण शक्ती पार्टीच्या वतीने प्रहरसेवक आशिद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणला सुरवात करण्यात आली आहे.याची माहिती मिळताच आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या वेळी चिमूर शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष अविनाश अगडे,कार्तिक मेश्राम, शिवसेना तालुका प्रमुख बालूभाऊ सातपुते,सोमेश्वर डाहुले, सुरेश परचाके,अरविंद नैताम,जितेंद्र दुर्गे, बाबुराव धोंगडे, उमेश धोंगडे, स्वप्नील धोंगडे, चरनदास मेश्राम, राजू डावले, पुरुषोत्तम मत्ते,आणि त्या पांदण रस्तावरील २० शेतकरी उपोषण स्थळी उपस्थित होते.