जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर: -मागील वर्षी अतिवृष्टी ने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली असल्याने हाता तोंडातला घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. त्यामुळं अनेक शेतकरी हतबल झाले होते. कशीबशी शेतकऱ्यांनी शेतीची सुधारणा केली.मात्र दरवर्षी शेतकरी शेतीचा विमा काढून पिक विमा कंपनीला बँकेमार्फत रकमेचा भरणा केला जातो. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळं अतिव्रुष्टीत झालेल्या नुकसानीचे तत्काळ पिक विमा योजनेअंतर्गत मदत मिळवून दयावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्याकडे केलेली आहे.
तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गुरांचा गोठा सन 1921-22 मधील चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावे, पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ तात्काळ मिळवून देणे, सोयाबीन कापूस पिकांवरिल आयात थांबवून निर्यातीबाबत निर्णय घेणे, शेतमालाबाबत वायदेबंदी उठ्वावी, थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येवू नये, चालू शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा, शेती मशागत पेरणी ते माल विकतपर्यंत येणाऱ्या खर्चावर दिडपट भाव देण्यात यावा, नाफेडद्वारे होणारा चणा खरेदी प्रती हेक्टर 7.5 वरून 15 हेक्टर करण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांनी वीज डिमांड भरली आहे अश्या शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी तात्काळ करावी, चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवून द्यावा, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, ऑनलाईन 7/12 मधील चुका सरकारने लवकर दुरुस्त कराव्यात, शेतीची कामे संपल्यानंतर शासनामार्फत शेतमजूरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, ई पिक पाहणी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात यावे.
तरी वरील सर्व मुद्दे घेऊन मंत्रीमंडळात लक्षवेधून गांभीर्याने तात्काळ सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे पत्र चिमूर तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी शिवसेना विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांना दिले आहे. निवेदन देते वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड, प्रशांत कोल्हे, सुधाकर निवटे, समीर बल्की, भैया कारेकर, धनराज थुटे, डोमा आवरी, हरीचंद कोयचाडे, दादा दहीकर, भाऊराव डांगे, पुंडलिक चौखे, कृष्ण चौखे दिनेश गूळधे इत्यादी उपस्थित होते.