Breaking News

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या बाम्हणगाव येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ऋषीं किसन देवतळे वय वर्ष ६० असून ठार झाले असून बाम्हणगांव येथील रहिवासी आहे.हि घटना बफर क्षेत्रात घडली आहे.मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून कुणाची धान रोहनी तर कुणाची डवरण कामे सुरू आहे.

याकरिता शेतात शेतकऱ्यांची धावपळ मोठ्या प्रमाणावर सुरू असते.अशातच शेतकऱ्यांवर दैनंदिन वन्य प्राण्याचे हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. शेती जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांना या मासभक्षक प्राण्यापासून कशाप्रकारे बचाव करता येईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.वनविभागाने यापुढे अशा घटना घडू नये याकडे लक्ष द्यावे अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved