Breaking News

सोयाबिन पिकांवर रोग आल्याने शेतकरी सापडला संकटात

शिवसेनाच्या वतीने शेतकरी बांधवांनी चिमूर तहसिल कार्यालय येथे दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबिन पिकांवर रोग आल्याने शेतकऱ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी शिवसेनेच्या मार्फत चिमूर तहसिल कार्यालय येथे निवेदन सादर केले. चिमूर तालुक्यातील पुयारदंड तसेच तालुक्यातील इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबिन पिकांवर अॅलो मौज्याक नावाचा रोग आला आहे. या रोगामुळे शेतातील सोयाबिन पिके जमिन दोस्त होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हाती येणारा सोयाबिन माल हातातुन जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या पिकांची चौकशी करून चिमूर तालुक्यातील पुयारदंड व तालुक्यातील इतर गावातील सोयाबिन पिकांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ पंचनामे करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.यावेळी शिवसैनिक समीर बल्की, गजानन राऊत उसरपंच, वैभव ठाकरे, कमलाकर बोरकर, चंद्रशेखर नागेकर, विकास गवडी, चेतन पिचकाटे, नरेश राऊत, सुरेश गवळी, चंद्रशेखर नागेकर, राहुल फलके, मोरेश्वर झाडें ,हैशल वठाणे, अभिजित गावडे ,भुसन वानखेडे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved