कृषी अधिकारी पं स.चिमूर यांचेकडे तक्रार दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या सरडपार शिवारातील शेतात पेरलेले सोयाबीन अद्यापही हिरवेगार असल्याने शेतकऱ्यांने आश्चर्य व्यक्त केले आहे, नेरी येथील रहिवासी अशोक तिडके यांची सरडपार शेत शिवारात नऊ एकर शेती आहे पैकी तिन एकरामध्ये त्यांनी १२० दिवसाचा जड सोयाबीन २२८ ,रायझिन्स सिड्स वसंत कृषी केंद्र चिमूर येथून १२-६-२१ ला खरेदी केले व १६-६-२१ ला पेरणी केली.
पेरणी नंतर झाड व्यवस्थित आले चलपा ( शेंगा) झाडाला पकडल्या मात्र चार महीन्याचा कालावधी लोटुन गेला तरीही आतापर्यंत सोयाबीन कापणीवर आला नाही, त्यामुळे सोयाबीन बियाणे निक्रुष्ट दर्जाचे माथी मारले तर नाही ना ? या शंकेने शेतकऱ्यांला घेरले आहे.
अजुनही पेरलेला सोयाबीन हिरवागार असुन दाना हिरवा ,नुसत्या शेंगा चलपा,काही काही शेंगाना दाने डॉमिस भरले आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांने कृषी अधिकारी पं स.चिमूर यांचेकडे दि १३-१०- २१ ला तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.