Breaking News

वरोरा येथे धनगर समाजाचे मुख्यमंत्री यांना निवेदन आरक्षणाचा मुद्दा 50 दिवसाची मुद्दत संपली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-महाराष्ट्रात धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी 50 दिवसाची मुदत मागितली होती. हा 50 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एरणीवर असतांना आपल्याही धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा. अशी इच्छा धनगर समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास करून उचित निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून देण्यात आले होते. परंतु या दिवसाची मुद्दत संपली असून कोणताही निर्णय आतापर्यंत आला नाही.

म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आता धनगर समाज उभा झाला असून आणि शांततेत मुख्यमंत्री यांना जिल्हा व तालुका स्तरावर तहसीलदार मार्फत धनगर आरक्षण व सोबतच सात योजनांची मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी वरोरा तहसील कार्यालय वरोरा येथे तहसीलदार योगेश कौटकर यांना वरोरा तालुका धनगर समाज बांधवानी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देते वेळी गजानन शेळके, सोनूताई येवले, डॉ. सरवदे, प्रभाकर ढाले, संजय बोधे, रवींद्र गावंडे, शिरीष उगे, गणेश चिडे, रमेश चिडे, वसंत खाणेकर, वसंत काळे, रामकृष्ण बोबडे, अशोक वैद्य, श्रेयश झाडें, गजानन नवघरे, ज्ञानेश्वर झिले, अतुल येवले, मंगेश झिले, भारत झिले, प्रफुल करडे, अश्विन धावणे, डॉ संकेत झाडे, विजय धावणे, तुकाराम धवणे, मनोज झाडे, आराध्य धवणे, बंडू, डाखरे, अशोक तुरारे, मारुती धोटे, बंडूजी ठाकरे, अजिंक्य काळे आशिष गोंडे, निकेश मोटके, दशरथ लाखे पंडित लोंढे, प्रामुख्याने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved