Breaking News

खेळ हा सत्तेचा चालला खेळात गुंतले नेते सत्तेच्या खेळा मुळे शेतकरी,शेतमजूर,सर्वसामान जनतेच्या प्रश्नाकडे झाले दुर्लक्ष-शेतकरी नेते विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/चंद्रपुर:-निवडणुकीच्या काळात राजकीय नेते जनतेला कोणते आश्वासन देतील हे सांगता येत नाही. आश्वासनाच्या जोराव निवडणुका जिंकल्या जातात आणि एकदा निवडून आले की मग मात्र आश्वासनांना राजकीय नेते विसरून जातात.भारतात लोकशाही आहे.अनेक राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत असतात.त्यातील काही प्रमुख राजकीय पक्षांना सत्ता प्राप्त होते.हे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी जनतेसमोर जाताना प्रत्यक्षात न उतरणारी अनेक आश्वासने जनतेला देत असतात.जनता ही अनेकदा या आश्वासनावर भाळून राजकीय पक्षांना मतदान करीत असते. भारतात लोकांचा राजकीय नेत्यांवर फार विश्वास असतो.त्यामुळे आपल्या नेत्याने दिलेले आश्वासन तो नक्की पूर्ण करणार असे सर्वसामान्य साध्या-भोळ्या जनतेला वाटते आणि लोक डोळे बंद करून आपल्या नेत्यावर विश्वास टाकतात व त्यांच्या पक्षांना मतदान करतात.

त्यामुळे नेते सुद्धा जनतेला अनेकदा मूर्ख समजून त्यांना प्रत्यक्षात न उतरणारी आश्वासने देतात व त्यांची फसवणूक करतात,जनता जर भावनिक प्रश्नांना जास्त महत्त्व देत असेल तर शेतकरी,शेतमजूर व जनतेच्या मुख्य प्रश्न बाजूला राहतील.आणि धार्मिक,भावनिक मुद्द्यांना राजकीय पक्ष नेहमी आपले राजकीय हत्यार बनवून जनतेचा वापर काहा करतात असा प्रश्न शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जनता पुन्हा पुन्हा अशीच मूर्ख बनवल्या जाईल आणि आपल्या हिताचे,कल्याणाचे प्रश्न नेहमी करीता दुर्लक्षित राहतील.तेव्हा आता तरी जनतेने राजकीय पक्षाच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना शेतकऱ्यांच्या शेतमजूर व जनतेच्या मुलभूत
प्रश्नांकडे लक्ष द्या असा खरपूस प्रश्न प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved