Breaking News

राज्यातील कुठलाही व्यक्ती घरकुलासाठी अर्ज करू शकतो

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करता येणार आहे त्याकरिता हि 51 शहरे मंजूर करण्यात आलेली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 51 शहरांची निवड करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये 1) बृहन्मुंबई, 2) पुणे, 3) नागपूर, 4) पिंपरी-चिंचवड, 5) ठाणे, 6) नाशिक, 7) नवी मुंबई, 8) सोलापूर, 9) औरंगाबाद, 10) कल्याण-डोंबिवली, 11) कोल्हापूर, 12) सांगली, 13) अमरावती, 14) मिरा भाईंदर, 15) उल्हासनगर, 16) भिवंडी, 17) अहमदनगर, 18) अकोला, 19) जळगाव, 20) नांदेड वाघाळा, 21) धुळे, 22) मालेगाव, 23) वसई विरार, 24) लातूर, 25) परभणी, 26) चंद्रपूर, 27) इचलकरंजी, 28) जालना, 29) भुसावळ, 30) पनवेल, 31) सातारा, 32) बीड, 33) यवतमाळ, 34) गोंदिया, 35) बार्शी, 36) अचलपूर, 37) उस्मानाबाद, 38) नंदूरबार, 39) वर्धा, 40) उदगीर, 41) हिंगणघाट, 42) अंबरनाथ, 4.3) बदलापूर, 44) बुलडाणा, 45) गडचिरोली, 46) वाशिम, 47) भंडारा, 48) हिंगोली, 49) रत्नागिरी, 50) अलिबाग, 51) सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग अशी एकूण 51शहरांची नावे मंजूर करण्यात आली.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत केवळ त्या शहरात रहिवासी राहणाऱ्या व्यक्तीलाच अर्ज करता येतो. परंतु शासनाने आता राज्यातील कुठलाही व्यक्ती कोणत्याही शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करता येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved